Nero’s Guest

अनेक वर्षापूर्वी रोममध्ये निरो नावाचा राजा होता. अत्यंत निर्दयी, दुष्ट, खुद्पसंत, विलासी म्हणून तो प्रसिद्ध होता. रोमच्या इतिहासातला सगळ्यात भयानक दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्याविना मरत होते, पैसे-सोन्या ऐवजी लोक अन्नाची चोरी करायला लागले होते. अनेकांचा जीव जात होता आणि त्याचवेळी निरोने त्याच्या राजवाड्यात अलिशान मेजवानीचे आयोजन केले. रोममधल्या सगळ्या श्रीमंत, उद्योजक (आजच्या भाषेत page ३ personalities) या पार्टीला आमंत्रित होत्या. बाहेर एक वेळचे अन्न मिळत नव्हते पण इथे मात्र सगळ्या गोष्टी वाया जात होत्या. सगळे होते मात्र रोषणाई नव्हती. निरोने आदेश दिला. जेल मधल्या सगळ्यांना बाहेर काढा आणि मोठ्या लाकडाला बांधा. जेलमध्ये लहान, मोठे, महिला, वृद्ध सगळे होते. पैसे नाही पण अन्नाची-पाण्याची चोरी करणारी हि निष्पाप मनसे. निरोने आदेश दिला या सगळ्या लाकडाला बांधून जिवंत जाळून टाका. राजाचीच आज्ञा…लगेच त्याचे पालन केले गेले. सगळ्या लोकांना जिवंत जाळण्यात आले. आणि त्याच्या रोषणाईत लोकांनी मेजवानीचा आनंद(?) घेतला.

प्रश्न हा नाहीच कि निरो कोण होता? तो मूर्ख, निर्दयी होताच. पण खरा प्रश्न हा आहे कि निरो कडे आलेले ते पाहुणे कोण होते?  Who were Nero’s Guest? कोण होती ती लोक कि ज्यांनी लोक जिवंत जाळली जात असताना त्याकडे दुर्लक्ष करत, स्वताच्याच मस्तीत गुंग होती. अनेक वर्ष शेतकरी आत्महत्यांवर काम करणारे पी. साईनाथ म्हणतात,” अनेक वर्ष शेतकरी आत्महत्यांवर काम केल्यानंतर माझ्या लक्षात आले कि निरो कडे आलेले ते लोक कोण होते. तुम्ही, मी आणि ती सगळी लोक जि आजूबाजूच्या दुखः न लक्षात घेता स्वताच्या मस्तीत धुंद असतात ती सगळी Nero’s Guest होती.”

महराष्ट्रात या वर्षी १९७२ नंतरचा सगळ्यात मोठ्या दुष्काळाच संकट आहे. पाऊसाची चातकासारखी वाट पाहून शेतकरी शेवटी स्वताचा जीव देतोय. पण शहरातील लोकांना मात्र त्याचे काहीच नाही असे दिसते.

आज गोकुळाष्टमी. सगळीकडे दही हंडीची धूम सुरु आहे. पण यावर्षी दुष्काळ लक्षात घेऊन मुंबईत अनेक मंडळांनी दहीहंडी रद्द केली आणि आलेला पैसातून मराठवाड्यात पाण्याचे tanker पाठवले. जळगावात देखील अनेक दहीहंड्यानि पाण्याचा वापर टाळून कोरडी दहीहंडी साजरी केली. पण महाबळमध्ये मात्र ड्रम भरून भरून पाणी ओतले जात होते. DJच्या तालावर सगळ विसरून लोक पाणी वायाघालवत होती. पाण्याचे ओघळ संपूर्ण रस्त्यावर पसरलेलं होते. DJच्या धुंदीत,मस्तीत गुंग लोकांना शेतकऱ्यांचे दुखः दिसत नाही का? ज्यांना ओंजळभर पाणी मिळवण्यासाठी मैलोनमैल चालणाऱ्या महिला, स्वताची शाळा सोडून tanker मागे बादली घेऊन पळणारी मुल दिसतच नाहीत? ओघळलेल्या पाण्याच्या डबक्यात यांना झाडाला लटकून जीव देणाऱ्या शेतकऱ्याच प्रतिबिंब कस दिसत नाही? शेतकरी कर्जाने नाही तर प्रेमभंगाने आत्महत्या करतात असे म्हणल कि प्रश्नच संपतो. आपल्याला पाणी मिळतंय ना मग उडवा. धुवा आपल्या गाड्या आणि compound, लोक मारतायेत तर मरू द्यात. आपल्याला काय? पाणीसंपल तरी शहराला पाणी मिळणारच आहे ना? ते पाणीटंचाई त्याची झळ हि सगळी ग्रामीण भागाला. आपल्याला कुठे डब्बे घेऊन tankerच्या मागे धावायचय……

पाण्याविना लोक मरत असताना आपण काही करणार आहोत कि नाही? कि पी.साईनाथ म्हणतात त्याप्रमाणे निरोच्या मेजवानीत आलेली ती लोक आपणच Nero’s Guest?